" लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे "
- बाजीप्रभू देशपांडे
महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. सिद्दी जोहर वेढा सैल करायची काहीच चिन्हे दिसत नव्हती. सरसेनापती नेताजी पालकर हि वेढा फोडण्यात अयशस्वी झाले होते . त्यांनी वेढा फोडायचा प्रयत्न केला पण सिद्दी जोहर सावध होता आणि त्याने राखीव सैन्य बचावासाठी पाठवले. त्यामुळे नेताजी रावांचा नाइलाज झाला. त्यांना माघार घ्यावी लागली. यामध्ये सैन्याच हि खूप नुकसान झालं. या लढाईत सिद्दी हिलाल याचा मुलगा मारला गेला. महाराज हे सर्व गडावरून पाहत होते. त्यांनी गड उतरण्याची व्यवस्था केली होती पण खास नेताजी पलायन करताना पहिला आणि उरली सुरली अशा हि निघून गेली. आता महाराजांना थोडा वेगळा विचार करावा लागणार होता .
महाराजांना आता आशा होती ती केवळ मेघराज कडून. एकदा का मेघराज कुमक घेऊन आला कि सिद्दी जोहर चा काही निभाव लागणार नाही. पावसामुळे वेढा सैल होईल आणि त्याचा फायदा घेऊन आपण निसटू असा बेत महाराज आखू लागले. पण झाले वेगळेच सिद्दी खूप चिवट निघाला. त्याने सर्व तंबूंना ताडपत्रीची तजवीज केली आणि वेढा आणखी मजबूत केला. हे सर्व पाहून महाराज खूपच चिंतीत झाले.
शाहिस्तेखान पुण्यावर चाल करून येत होता. जर मुघल आणि आदिलशाही मिळाली. तर त्यांना स्वराज्याचा घास घ्यायला उशीर लागणार नाही. त्यामुळे महाराजांना काहीही करून वेढा फोडून राजगड गाठणे अनिवार्य होते. पण काही मार्गच दिसत नव्हता. आणि एका रात्री महाराजांना मार्ग दिसला. महादेव नावाचा त्यांचं एक गुप्तहेर बातमी घेऊन आला कि वेढ्याच्या एका बाजूस एक मार्ग आहे. रात्रीचा फायदा घेऊन वेढा फोडता येईल. महाराज खुश झाले पण बाहेर चाळीस हजाराची फोउझ होती. जराजरी चूक झाली तरी सर्व जीवानिशी जातील मग करायच काय महाराज विचार करू लागले. त्यांनी सिद्दी ला पत्र पाठवले कि आपण शरण येत आहोत म्हणून. सिद्दीचा विश्वासच बसेना कि अफजल खानाला मारणारा राजा आपणाला शरण येत आहे. त्याचा आनंद गगनात मावेना.
महाराजांना जे पाहिजे होते ते झाले महाराज शरण येणार म्हणून वेढ्यातील सर्व सैनिक खूप खुश झाले होते. आता महाराजांना योग्य संधीची वाट बघायची होती. आणि ती संधी आली . महाराज आपल्या काही निवडक मावळ्या निशी रात्री दहा च्या सुमारास निघाले. महाराजांनी आपल्याच उंचीच्या आणि आपल्याच कड काठीच्या शिव काशीद ची निवड केली सिद्दीची दिशाभूल केली.. शिवा काशीद काही मावळ्यांसह मलकापूर मार्गे महाराजांना घोडखिडीपाशी येऊन मिळणार होता. आणि महाराज पांढरपाणी मार्गे येणार होते. पण शिव काशीद शत्रूस सापडला. त्यावेळी गस्तीवर मसूद खान होता. त्यास खूपच आनंद झाला. कि आपण शिवास पकडले. तो त्यास घेऊन सिद्दी जवळ गेला. सिद्दी ला समजले नाही कि ते महाराज नाहीत . पण तोच अफजल खानाचा मुलगा फाजल खान तेथे आला आणि त्याने ओळखले कि ते महाराज नाहीत ते. आणि सिद्दी चवताळला त्याने शिवास महाराजां विषयी विचारले पण त्याने नाही सांगितले . त्याचा राग अनावर झाला आणि तलवार शिवाच्या छातीच्या आरपार गेली.
सिद्दीचा समज झाला कि महाराज अजूनही गडावरच आहेत. त्यामुळे त्याने वेढा आणखीन आवळला. तिकडे मसूद खान महाराज्यांच्या शोधात निघाला. त्यावेळी त्याच्याकडं साडे चार हजाराची फॉऊंज होती. तोपर्यंत महाराज घोडखिडीपाशी पोहचले होते. महाराज विशाल गड गाठणार तोच खबर लागली कि सुर्वे आणि सावंत गडाला वेढा देऊन बसले आहेत आणि मसूद खान मागावर आहे. कोणत्याही परिस्थितीत बंद न पडणारी महाराजांची विचारशक्ती बधिर झाली. त्यांना काही सुचेना. विशालगडाला वेढा असण्याचे काळाने त्यावेळी केवळ अशक्य होते. आता करायाचे काय मागे मसूद खान फॉऊंज घेऊन येत आहे आणि पुढे वेढा . त्यावेळी बाजीप्रभू म्हणाले महाराज तुम्ही विशालगड गाथा आम्ही गनिमास येथे घोडखिंडीतच रोखतो. फक्त गडावर पोहचल्यावर तोफांचे तीन बार काढा म्हणजे आम्हास समजेल. तुम्ही सुखरूप गडावर पोहचला ते.
महाराजांचा पाय तेथून निघत नव्हता कारण काहीही झाले तरी या सर्वांचा मृत्यू ठरलेलाच .
त्यावेळी महाराजांच्याकडे सातशे ची फॉऊंज होती. त्यातील निम्मे मावळे घेऊन महाराज निघाले. पन्हाळा ते घोडखिंड हे अंतर जवळ जवळ ५० किलोमीटर आहे. आणि हे अंतर एका रात्रीत सर केलेले हे मावळे आता सडे चार हजाराच्या ताज्या दम्याच्या सैन्याबरोबर लढणार होते. तीनशे विरुद्ध सडे चार हजार असा रणसंग्राम त्या घोडखिंडीत घडणार होता.
पण खूपच कमी लोकांना हे माहित आहे कि महाराज हि तीनशे मावळ्यानिशी विशाल गडाचा वेद फोडण्यासाठी निघाले होते. सुर्वे आणि सावंत निकराची झुंज देत होते. महाराज हि पराक्रमाची शर्थ करत होते. महाराजांची भवानी तलवार सुदर्शन चक्रासारखी शत्रूंवर चालत होती. तोच गडावरील मावळ्यांना सुगावा लागला कि महाराज गडाखाली आहेत आणि धावले मावळे महाराज्यांच्या मदतीला मावळे आतून तर महाराज बाहेरून वेढा फॊधण्याचा प्रयत्न करत होते. तरीही वेढा फोडायला सहा तास लागले.
इकडे बाजीप्रभू पराक्रमाची शर्थ करत होते. इंच इंच जमीन लढवत होते. जवळ जवळ चौदा तासाची अखंड पायपीट आणि आता साक्षात मृत्यूशी युद्ध. सर्वाना माहित होते कि मृत्यू ठरलेला तरीही सर्व निकराने लढत होते का तर महाराजांसाठी. त्यांचा जीव वाचला पाहिजे. कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे. साक्षात मृत्यू तेथे सहा तास वाट बघत बसला होता. बाजीप्रभू दोन्ही हातात तलवार घेऊन गनिमांवर बरसात होते. बाजींनी जवळ जवळ गनिमांच्या सात तुकड्या मारल्या होत्या. पण गनीम संख्येने जास्त होता. बाजींचा निभाव लागणे शक्य नव्हते . तरीही बाजी प्राणांची बाजी लावून घोडखिंड लढवत होते. मसूद खानाला समाजत नव्हते कि काय होतंय ते सलग सहा तास युद्ध सुरु आहे तरीही एक इंच हि आपण पुढे सरकू शकलो नाही. त्याने बंदूक मागवली आणि बांजींचा वेध घेण्यास सांगितले. बाजी जायबंदी झाले. गोळी बाजींच्या छातीत लागली होती. बाजींना बाजूला नेण्यात आले. पण खिंड अजूनही लडतच होती . बाजी शुद्धीवर आले आणि म्हणाले तोफ झाली काय ? सर्वानी नकार्थी मन डोलावली. आणि बाजी त्याही अवस्थेत उठले तोच तोफेचा आवाज झाला. सर्वाना आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याचं वाटत होते . त्यातील एक हि राहिला नाही.
त्यांच्या रक्ताने पावन झाली म्हणून हि पावनखिंड.
पावनखिंड
Reviewed by aniket
on
March 10, 2018
Rating:

No comments: