एका दिवसात मराठ्यांनी बसनूर शहरातील सगळी संपत्ती ताब्यात घेतली. जवळपास दोन ते तीन कोटी रुपयांची संपत्ती महाराजांना तेथे सापडली. अचूक नियोजन म्हणतात ते याला. सुरतेचा अनुभव ज्यांनी ऐकला होता त्यांनी अजिबात कटकट न करता महाराजांना पैसे उपलब्ध करून दिल्यामुळे वेळ वाचला. महाराजांनी कोणाच्याही जीवाला धोका न लावता पुढे कूच करणे पसंद केले आणि महाराज गोकर्ण महाबळेश्वर ला निघाले. तेथून महाराजांनी शिवाप्पा नाईक नावाच्या बेदनूर प्रांतातील जहागीरदाराला आपण आम्हास प्रतिवर्षी काही पेशखुशी देऊ करून तुमचा वकील आमच्याकडे पाठवावा असा निरोप पाठविला.
त्या जहागीरदाराने पेहखुष घेण्याची असल्यास ती येऊन घ्या असा उद्धट निरोप पाठवला. मग महाराजांनी त्याला वठणीवर आणण्याचे काम हाती घेतले. या प्रांतावर स्वारी करून बेदनूरमधील एक एक ठाणे म्हणून सर करायचा सपाटा लावला. मग मात्र तो अगदी सुतासारखा सरळ होऊन शरण आला. आपण दरसाल तीस लाख रुपये खंडणी दाखल देत जाऊ असे काबुल झाला. मग महाराज पुढे निघाले.
गोकर्णास १२ गलबते ठेवून बाकीचे आरमार महाराजांनी परत पाठविले. आपल्याबरोबर फक्त चार हजार लोक घेऊन ते कारवार मध्ये दाखल झाले. याची बातमी तेथील इंग्रजांना लागली आणि ते सर्व आपले चंबूगबाळ बांधून मास्कचा एका गलबतावर जाऊन लपले. नेमका त्याचवेळी एक आदिलशाही सरदार शेरखान कारवारात आला. त्याच्या सोबत फक्त ५०० स्वार होते तरीही त्याने महाराजांना निरोप दिला कि तुम्ही शहरात प्रवेश करावयास याला तर आम्ही त्याचे रक्षण करावयास तयार आहोत.
आता महाराजांना कोणत्याही परिस्थित त्यांना उत्तर दिल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते. महाराजांच्या नुसत्या रागावण्यानेच शेरखान आणि इंग्रज शरण आले. त्यांनी ११२ पौंड महाराजांना पेहखुष म्हणून दिली आणि आपली सुटका करून घेतली. मिर्झाराजांच्या आक्रमणामुळे महाराजांकडे तेवढा वेळ नव्हता नाहीतर कारवारची सुरत व्हायला तो वेळ काय लागला असता.
म्हणून महाराजांनी हि मोहीम थोडक्यात आटोपती घेतली आणि एका मोठ्या गलबतात बसून महाराज पुन्हा जलमार्गाने स्वराज्याकडे निघाले.
त्या जहागीरदाराने पेहखुष घेण्याची असल्यास ती येऊन घ्या असा उद्धट निरोप पाठवला. मग महाराजांनी त्याला वठणीवर आणण्याचे काम हाती घेतले. या प्रांतावर स्वारी करून बेदनूरमधील एक एक ठाणे म्हणून सर करायचा सपाटा लावला. मग मात्र तो अगदी सुतासारखा सरळ होऊन शरण आला. आपण दरसाल तीस लाख रुपये खंडणी दाखल देत जाऊ असे काबुल झाला. मग महाराज पुढे निघाले.
गोकर्णास १२ गलबते ठेवून बाकीचे आरमार महाराजांनी परत पाठविले. आपल्याबरोबर फक्त चार हजार लोक घेऊन ते कारवार मध्ये दाखल झाले. याची बातमी तेथील इंग्रजांना लागली आणि ते सर्व आपले चंबूगबाळ बांधून मास्कचा एका गलबतावर जाऊन लपले. नेमका त्याचवेळी एक आदिलशाही सरदार शेरखान कारवारात आला. त्याच्या सोबत फक्त ५०० स्वार होते तरीही त्याने महाराजांना निरोप दिला कि तुम्ही शहरात प्रवेश करावयास याला तर आम्ही त्याचे रक्षण करावयास तयार आहोत.
आता महाराजांना कोणत्याही परिस्थित त्यांना उत्तर दिल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते. महाराजांच्या नुसत्या रागावण्यानेच शेरखान आणि इंग्रज शरण आले. त्यांनी ११२ पौंड महाराजांना पेहखुष म्हणून दिली आणि आपली सुटका करून घेतली. मिर्झाराजांच्या आक्रमणामुळे महाराजांकडे तेवढा वेळ नव्हता नाहीतर कारवारची सुरत व्हायला तो वेळ काय लागला असता.
म्हणून महाराजांनी हि मोहीम थोडक्यात आटोपती घेतली आणि एका मोठ्या गलबतात बसून महाराज पुन्हा जलमार्गाने स्वराज्याकडे निघाले.
पहिली आरमारी मोहीम भाग २
Reviewed by aniket
on
March 29, 2018
Rating:

No comments: