google add

banner image
banner image

मराठा आरमार

"नौदल ही  कोणत्याही सामराज्याची स्वतंत्र ताकत असते ज्याच्याकडे नौदल आहे तो लाटांवर राज्य करतो."                                                         - रामचंद्र अमात्य छत्रपती शिवरायांचे अमात्य.
     
              छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत  सुसज्ज अशा नौदलाची केलेली उभारणी हे त्यांचे खूप मोठे कार्य आहे. सिद्दी, ब्रिटिश आणि पोर्तोगीज यांना शह  देण्यासाठी त्यांनी योग्य ठिकाणी सागरी किल्ले उभारले. छोट्या मोठ्या  नौका, जहाजांची बांधणी केली. तो काळ असा होता कि, शिवाजी महाराजांच्या प्रबळ नौदलाचा ताफा समोरून जात असताना पोर्तोगीजांच्या नौदलाने कोणतीही हालचाल केली नाही. ब्रिटिशांनी तर कान्होजी आंग्रे कडे समुद्रातून मालाची ने आन करण्यासाठी अखेरपर्यंत कर भरला. छत्रपती शिवरायांच्या  या सुसज्ज  नौदलविषयी........ 

              गुजरातमधील लोथल येथे प्राचीन बंदर आणि जहाजबांधीनीची जी जागा आढळून आली आहे, ती आपल्याला इसवी सणाच्या एक हजार वर्ष मागे घेऊन जाते. जहाजबांधणीच्या कलेत भारतीय लोक प्राचीन काळापासून निपुण आणि अग्रेसर होते , हे यावरून लक्षात येते . भारतीयांनी भूमी गमावल्यानंतर सागरी व्यापार आणि जहाजांची संख्या कमी झाली , नंतर हि पोकळी अरबांनी भरून काढली . अरबस्तानातून येणाऱ्या व्यापाराच्या वसाहती लवकरच भारताच्या पश्चिम तटावरील बहुतांश महत्वाच्या बंदरावर  उभ्या  राहू   लागल्या . अशा काळात सागरी शक्तीची जाणीव असलेले जे मोजके राज्यकर्ते झाले , त्यापैकी शिवाजी महाराज हे एक होते. त्यांनी दौलत खान आणि मायनाक भंडारी यांची नौदलाचे संयुक्त प्रमुख म्हणून नियुक्ती केली . लढाऊ नाविक दलाला पाठबळ देण्यासाठी अनेक सागरी किल्ले बांधले. मुंबई पासून १५० किलोमीटर दक्षिणेला महाराजांनी आपला मुख्य नाविक तळ उभारला. हि जागा पोर्तोगीज, ब्रिटिश  आणि सिद्दीच्या नौदल तळापासून सुरक्षित अंतरावर होती. मालवणपासून दोन किलोमीटर पाण्यात असलेल्या खडकावर उभारलेला हाच तो सिंधुदुर्ग किल्ला होय . स्थानिक मच्छिमारांना महाराज्यांनी  नौदलात भरती करून घेतले. त्यानंतरच्या काही वर्षांत महाराजांनी एकंदर ५८ किल्ले वापरात आणले . विजयदुर्ग आणि अलिबाग जवळील कुलाबा हे त्यातील महत्वाचे किल्ले.
           फेब्रुवारी १६६५ मध्ये  महाराजांनी आपल्या नाविक दलाच्या ताकदीची चाचणी घेण्याची ठरवले. दोन मोठ्या जहाजासह आणि ८८ नौकांसह चार हजारांचे सैन्य घेऊन मराठ्यांचे नौदलाने बसनूर बसनूर या बंदरावर हल्ला चढविला. हा ताफा बसनूर कडे  निघाला असताना गोव्याजवळील पोर्तोगीजांच्या नौदलातील  पहिला; परंतु अत्यंत प्रबळ असे मराठा नौदल पाहून पोर्तोगीजानी शहाणपणाने या ताफ्यापासून दूर राहणे पसंद केले . १६८० पर्यंत मराठा नौदल खूप शक्तिशाली बनले होते. मराठा नौदलाकडे त्याकाळी ३०० टन वहनक्षमता असलेली ४५ जहाजे होती तर १५० छोट्या नौका आणि सुमारे ११०० गलबते या ताफ्यात होती. ब्रिटिश व्यापाऱ्यांचा भारतातील कावा ओळखणाऱ्या मोजक्या राज्यांपैकी शिवाजी महाराज हे एक होते. मुंबईजवळ जंजिरा येथे ब्रिटिशांनी सिद्दीला दिलेला आश्रय हे ब्रिटिश आणि मराठे यांच्यातील पहिल्या संघर्षाचे कारण ठरले. मराठ्यांच्या नौदलाची सिद्द्यांशी गाठ पडली, तेंव्हा तो घाबरला आणि मुंबई जवळील बंदरावर त्याने आश्रय घेतला. हे ठिकाण तोपर्यन्त ब्रिटिशांचे प्रमुख व्यापारी केंद्र बनले होते . परदेशी ताकातीला शह द्यायचा असेल तर मुंबईकडे येणार त्यांचा मार्ग बंद करायला हवा आणि त्यासाठी एक किल्ला बांधायला हवा हे शिवाशी महाराजांनी ओळखले. १६७२ मध्ये शिवाजीमहाराजांनी मुंबईजवळील खांदेरी हे छोटे बेत ताब्यात घेतले, हे बंदर त्यावेळी मुंबईकडे सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूला थोपविण्यास योग्य होते आणि त्या साह्याने ब्रिटिशाना शह  देता येईल हे शिवाजीमहाराजांनी ओळखले. अत्यंत काळजीपूर्वक सर्व जुळवाजुळव करून शिवरायांनी त्याच वर्षी त्या बेटावर किल्ला बांधायला सुरुवात केली.
               दौलतखान आणि मायनाक भंडारी या शिवरायांच्या दोन प्रमुख नौदल अधिकाऱ्यांनी या बांधकामाची सूत्रे सांभाळली. खांदेरी हे मुंबई द्वीपसमूहाचाच एक भाग आहे आणि त्यामुळेच ते आमच्या अखत्यारीत येते येतात असा दावा ब्रिटिशांनी केला. ब्रिटिश आणि सिद्दी यांनी मारात्यांच्यावर एकत्रित पाने हल्ला करण्याची धमकी दिली. त्यावेळी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर होते आणि महाराजांना त्यावेळी या मुद्याकडे गांभीर्याने पाहण्यास पुरेसा वेळ नव्हता. सात वर्षानंतर महाराजांना ज्यावेळी या परिसराकडे पाहण्यासाठी सवड  मिळाली, तेंव्हा या बेटावरील किल्ल्याचे बांधकाम २ सप्टेंबर १६७९ रोजी पुन्हा सुरु करण्यात आले. पोर्तोगीजानी या घटनाक्रमाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. ब्रिटिशांवर पुरेसा दबाव आणण्यासाठी महाराजांनी मुंबई बंदराची घेराबंदी जमीवरील सैन्याच्या साह्याने करण्याचे ठरवले. मुंबई हल्ला करण्यासाठी महाराजांनी चार हजाराचे प्रबळ सैन्य कल्याण परिसरात जमवले. अखेर मराठयानी पाचशे जणांचे सैन्य खांदेरी बेटावर उतरवले आणि बांधकामास सुरुवात झाली. यातील दोनशे लोक बांधकाम मजूर तर तीनशे लोक सैनिक होते . या तुकडीची रसद तोडून त्यांना शरण आणण्याचे ब्रिटिशांनी ठरवले. या कमी चार मोठी जहाजे मुंबईहून सोडण्यात अली; पण  या तुकडीला रसद पोहचवण्याचे काम मराठ्यांनी छोट्या नौकांच्या साह्याने रात्रीचा फायदा घेऊन सुरूच ठेवले.
                               १९ सप्टेंबर रोजी ब्रिटिशांनी या बेताचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला; परंतु दक्ष असलेल्या मराठा सैनिकांनी तो हाणून  पडला. अखेर ब्रिटिशांनी या तुकडीची रसद तोडण्यासाठी आणखी काही जहाजे समुद्रात पाठवली आणि याचा परिणाम मात्र दिसू लागला. २२ सप्टेंबर रोजी  उभय नौदलामध्ये मोठा संघर्ष झाला आणि आकाराने लहान असलेल्या मराठा नौदलाचे फार नुकसान झाले. रसद तोडण्याचा ब्रिटिशांचा डाव तीन महिने चालला. डिसेम्बर १६७९ मध्ये ब्रिटिशांनी बेटावरील तुकडीला निरोप पाठविला आणि शरण येण्यास सांगितले; परंतु शिवरायांनी त्यांच्या सैन्याला अखेरपर्यंत निकराची झुंज देण्याच्या सूचना दिल्या होत्या. जानेवारी १६८० मध्ये महाराजांनी राजापूर येथील वखारीवर  कारवाई केली आणि तेथील ब्रिटिशाना कैद केले.  अखेर ८ जानेवारी १६८० मध्ये ब्रिटिशाना तह करणे भाग पडले. या तहाअंतर्गत  ब्रिटिश आणि मराठे यांच्यात ३० रोजी एक करार झाला. खांदेरी बेटाची  ब्रिटिशांनी केलेली कोंडी फुटली. खांदेरी बेटावरील हा किल्ला ब्रिटिशांची कायमची डोकेधुकंही ठरणार होती. मराठ्यांयानी बचावात्मक पद्धतीने मिळवलेला हा मोठा  विजय ठरला. या संघर्षानंतर अवघ्या दोन महिन्यांनी महाराजांचे देहावसान झाले. नौदलाच्या माध्यमातून महाराजांनी ब्रिटिशांना दिलेली झुंज त्यांनी केलेली अखेरची लढाई ठरली. त्यांना आणखी आयुष्य लाभले असते तर त्यांनी  नौदल आणखी प्रबळ केले असते आणि किनारपट्टीकडे लक्ष केंद्रित केले असते हे नक्की. 

मराठा आरमार                      मराठा आरमार  Reviewed by aniket on March 08, 2018 Rating: 5

No comments:

AMAZON

Powered by Blogger.